मानेवाडा परिसरातील स्वामी विवेकानंद कॉलनीत भर दिवसा पथदिवे सुरू राहतात. दुपारी दोन पासूनच पथदिवे लागलेले असतात. त्यामुळे दिवसापासूनच विजेचा अपव्यय सुरू होतो. कॉलनीत येणाऱ्या देखभाल व दुरूस्ती कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष वेधण्यात आले. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले. पथदिवे नियमितपणे सायंकाळी सुरू होणे गरजेचे आहे.- मुकुंद सांबारे
दिवसा पडतोय उजेड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jun 2017, 1:00 pm