खरबीतील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये असलेल्या अंगणवाडीच्या आसपास अस्वच्छ पाणी साचले आहे. या पाण्यात डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. दुर्गंधीही पसरली आहे. त्यामुळे अंगणवाडीत येणाऱ्या बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून साचलेले हे पाणी येथुन काढत त्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त गरजेचा झाला आहे. या समस्येकडे महापालिकेचे तातडीने लक्ष द्यावे.- शुभम यादव
अंगणवाडीच्या आसपास अस्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Mar 2020, 5:47 am