रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही चौकातील खड्डा बुजविण्यात न आल्याने तुकडोजी पुतळा परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यामुळे चौकात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मात्र हा खड्डा बुजविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष नाही. त्यामुळे ही समस्या आता कुणाकडे घेऊन जावी, असा प्रश्न निर्माण होत आहे. हा खड्डा तातडीने बुजविणे गरजेचे झाले आहे.- राकेश आकरे
चौकातील खड्ड्याने वाहतुकीला अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2020, 5:46 am