वानाडोंगरी परिसरातील बाभडे ले-आऊट परिसरातील रस्ते पूर्णपणे फुटलेले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी या रस्त्यांवर साचत आहे. लक्ष्मीनारायण नगरातीही अशीच परिस्थिती आहे. यासंदर्भात नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. उलट रस्त्यांची अवस्था आधीपेक्षा खराब झाली. या प्रकराची तातडीने दखल घेण्यात यावी, अशी या भागातील नागरिकांची अपेक्षा आहे.- अरुण कराळे
रस्ता फुटल्याने साचले पावसाचे पाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2018, 5:32 am