बेसा, बेलतरोडी परिसरातील मार्गावर ठिकठिकाणी कचरा साचला आहे. त्यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. कचऱ्याच्या ढिगावर मोकाट जनावरे फिरतात. माशांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी पडलेल्या कचऱ्याची उचल व्हावी, अशी मागणी होत आहे.- विलास ठोसर
अस्वच्छता, दुर्गंधीचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jan 2018, 5:41 am