टाकळी पोलिसलाइन्स भागात असलेल्या तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. या तलावात लोक कचरा टाकतात. मूर्तींचे विसर्जनही याच तलावात केले जाते. इतकेच नव्हे तर निर्माल्यदेखील याच तलावात शिरवले जाते. त्यामुळे जलस्रोत पूर्णपणे दूषित झाला आहे. हा तलाव स्वच्छ करण्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांचे दुर्लक्ष आहे. त्याचा त्रास परिसरातील नागिरकांना सहन करावा लागत आहे.- संजय गुल्हाने
तलावाचे पाणी दूषित
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Apr 2018, 5:46 am