सुरेंद्रनगरात भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. या शाखेत चेक क्लिअरिंग यंत्र ठेवण्यात आले आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून हे यंत्र नादुरूस्त आहे. बँकेत चेक जमा करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना या ठिकाणी पाठविण्यात येते. मात्र यंत्रच नादुरूस्त असल्याने चेक टाकायचा कुठे आणि कसा, असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे. याबाबत बँकेच्या शाखा व्यवस्थापकांचे लक्ष वेधण्यात आले. यंत्र तातडीने दुरूस्त करण्याची मागणी करण्यात आली. यंत्राच्या नादुरूस्तीबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळविले आहे, एवढेच उत्तर एसबीआयकडून मिळत आहे. मात्र ग्राहकांना त्याचा त्रास होत आहे, या बाबीकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. एसबीआयच्या मुख्यालयाने या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या बँकेत येणाऱ्या ग्राहकांकडून करण्यात येत आहे.- अजित जामकर
एसबीआयचा भोंगळ कारभार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Mar 2020, 5:47 am