लक्ष्मीनगर ते दीक्षाभूमी मार्गावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळे या कचऱ्याच्या ढिगातून दुर्गंधी पसरली आहे. दीक्षाभूमीवर विविध ठिकाणाहुन लोक येत असतात. परंतु त्यांनाही अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. हे कचऱ्याचे ढिग येथुन नियमितपणे उचलण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.- प्रवीण गुप्ता
कचऱ्याच्या ढिगाने सुटली दुर्गंधी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Feb 2018, 5:39 am