शहरात अनेक ठिकाणी डाक विभागाने पत्रपेट्या बसविल्या आहे. परंतु या पत्रपेट्यांजवळ कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे या पत्रपेट्या आता कचरापेट्या बनत चालल्या आहेत. पत्र पेट्यांजवळील कचरा उचलण्यात यावा, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत आहे. परंतु महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पत्र टाकण्यासाठी येणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.- संगीता वाईकर
पत्रपेटीजवळ कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 May 2017, 5:34 am