रमणा मारोती परिसरातील रतननगर येथे विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय सुरू आहे. या भागातील पथदिवे दिवसाही सुरू ठेवण्यात येत आहे. मात्र या प्रकाराकडे महापालिकेचे लक्ष नाही. दिवसा पथदिवे सुरू ठेवण्यामागील प्रशासनाचा हेतू अनाकलनीय आहे. हा पैसा नागरिकांच्या खिशातून कराच्या स्वरूपात वसूल केला जातो. त्यामुळे ही नागरिकांच्या पैशांचीच उधळपट्टी आहे.- सागर आरू
विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2020, 5:47 am