काटोल रोडवरील एसबीआय कॉलनीतील रस्त्याची कामे अर्धवट सोडण्यात आली आहेत. या रस्त्याच्या कडेला गिट्टी आणि मुरूम टाकून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर अपघात होत आहेत. रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा महापालिकेकडून व्यक्त होत आहे.- अतुल वडोदकर
रस्त्याची कामे अर्धवट सोडली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jul 2017, 5:35 am