शहरातील विविध चौकांमध्ये ‘हायमास्ट’ पथदिवे बसविण्यात आले आहेत. सायंकाळनंतर हे दिवे सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र अनेक ठिकाणी हे पथदिवे दिवसाच सुरू राहत असल्याचे लक्षात आले आहे. पथदिवे दिवसाही सुरू राहात असल्याने विजेचा अपव्यय होत आहे. हा प्रकार तातडीने थांबविणे गरजेचे झाले आहे. या प्रकाराकडे महापालिकेच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष आहे.- सुमित खोब्रागडे
दिवसा सुरू राहतात पथदिवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2020, 5:47 am