शाहुनगर भागातील पथदिवे दिवसरात्र सुरू राहतात. त्यामुळे विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. विद्युत विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे पथदिव्यांपोटी येणारे विजेचे बील वाढत आहे. सर्वसामान्यांच्याच खिशातून बिलाची ही रक्कम करापोटी वसूल करण्यात येते. त्यामुळे ही नागरिकांच्याच पैशांची उधळपट्टी आहे. त्यामुळे संबंधित प्राधिकरणाने याची दखल घेणे गरजेचे आहे.- विलास ठोसर
दिवसाही सुरू राहतात पथदिवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Feb 2020, 5:46 am