वाडी परिसरात असलेल्या जवाहरलाल नेहरू कॉलेजजवळ गेल्या अनेक दिवसांपासून कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे कचऱ्याचे ढिग साचले आहेत. हा कचरा येथुन उचलण्याऐवजी जाळण्यात येतो. परिणामी परिसरात धुर आणि दुर्गंधी पसरत आहे. या कचऱ्याची नियमितपणे उचल करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे.- अरुण कराळे
कॉलेजजवळ जाळतात कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 May 2018, 5:37 am