सुदामनगरातील आम्रपाली बुद्ध विहार, यादवनगराच्या परिसरात रस्त्याच्या कडेला भंगारवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणामुळे या भागातील रस्ते अरुंद झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविणे अवघड झाले आहे. महापालिका शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटवित आहे. मात्र सुदामनगराकडे महापालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.- आकाश ठावरे
रस्त्यावरील भंगारामुळे वाहतुकीला अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2020, 5:46 am