धरमपेठ, गोकुळपेठ भागातील वाहतूक व्यवस्था धुळीस मिळाली आहे. या भागात बेशिस्त पार्किंग करण्यात येत असल्याने वाहतूक कोंडीत अडकली आहे. मात्र या समस्येकडे वाहतूक पोलिस विभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याने या भागातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्येवर पोलिस विभागाने तोडगा काढावा.- मानस मोगरकर
वाहतूक व्यवस्था मिळाली धुळीस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Nov 2019, 5:44 am