रिंगरोडवरील राधे मंगलमजवळ मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. या कचऱ्यात पथदिव्यांसाठी असलेले खांब बेवारसपणे फेकून देण्यात आले आहेत. या खांबांचे लोखंड चोरून नेण्यात येत आहे. काही खांब गंजले आहेत. त्यामुळे खांब खरेदी करण्यासाठी करण्यात आलेला खर्च वाया जात आहे. हे खांब कचऱ्याच्या ढीगातून आणि येथे साचलेल्या अस्वच्छ पाण्यातून उचलण्यात यावेत.- कृष्णकुमार दाभोळकर
कचऱ्यात फेकले पथदिव्यांचे खांब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Feb 2020, 5:45 am