रामनगर ते रविनगर भागांतील रस्त्यांवर मोकाट जनावरांचा मुक्तसंचार आहे. रस्त्याच्या मधोमध या जनावरांचा ठिय्या असतो. त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. रस्त्याच्या मधोमध जनावरे बसत असल्याने या भागातील वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. परिणामी येथील जनावरांची रवानगी कोंडवाड्यात करण्याची गरज भासू लागली आहे.- राज बोधी
मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Aug 2018, 5:37 am