मातृसेवा संघाजवळ असलेल्या रस्त्यावर पाण्याची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे येथे दररोज पाण्याचा अपव्यय होतो. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी महापालिका आणि जलप्रदाय विभागाकडे तक्रार केली. परंतु त्यानंतरही या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. हा प्रकार थांबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
- आश्लेष गायकवाड
- आश्लेष गायकवाड