बेसा, बेलतरोडी हा ग्रामीण भाग आता शहराला स्पर्श करू लागला आहे. तरीही या परिसरातील मूलभूत गरजा अद्याप पूर्ण होत नाहीत. त्यातील मुख्य समस्या आहे ती पाण्याची. पाणीपुरवठ्यासाठी येथे अद्यापही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही. या परिसरातील नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहावे लागते. उन्हाळ्यात तर ही समस्या अधिक उग्ररूप धारण करेल. तेव्हा प्रशासनाने यावेळी तरी ही समस्या सोडवावी.
- उमेश झाडे
- उमेश झाडे