घाट रोडवर गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा अपव्यय सुरू आहे. येथील जलवाहिनी फुटलेली आहे. त्यामुळे २४ तास पाणी वहात असते. एकीकडे उन्हाळ्याच्या दाहकतेमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय होत आहे. यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणेने गंभीरपणे लक्ष द्यायला हवे, अशी नागरिकांची मागणी आहे.- रवी मंदावार
पाण्याचा अपव्यय कायम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jun 2017, 5:33 am