शहरात पंचवटी आर के शालीमार येथे 50 वर्षा पूर्वी पासून कारंजे आहेत, आता वनविहार काॅलोनी जवळ नवीन कारंजा होत आहे. आहे त्याच कारंजां ची योग्य देखभाल होत नसल्याने त्या ची दुरावस्था होते. नवीन असले की निगा राखली जाते. नंतर पाणी नसले की पंप बिघडतो, पाणी व पंप बरोबर असलं की वीजपुरवठा नसतो. उन्हाळ्यात तर पाण्याची कमतरता असते अभावी कारंजा अक्षरशः उकीरडा भासतो. सदरहु चौकात कलात्मक असे पुतळे असावे, जेणेकरून कचराकुंडी चे स्वरूप येणार नाही. स्वच्छ नासिक हरीत नासिक असावे.
- : कारंजा ची कचराकुंडी :-
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2020, 5:45 am