करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रार्थना स्थळे उघडण्याची मागणी अयोग्य आहे.कारण आता नवरात्रात,दसरा,दिवाळी महत्वाचे सण आल्याने मंदीरात गर्दी होणं स्वाभाविक आहे.पण ही बाब सध्यातरी धोकादायक आहे. 'भाव तेथे देव'आपल्या घरात मंदिरातील देव आहेतच ना?देव भक्तीचा भुकेला असतो. त्यामुळे मंदीरात जाऊन दर्शन घेण्याचा आग्रह धरू नये.आपला व इतरांचा जीव धोक्यात न घालता समंजसपणा दाखवावा व सहकार्य करावे.
प्रार्थना स्थळे उघडण्याबाबत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Sep 2020, 5:30 am