शिक्षण क्षेत्राकडे एक पवित्र व पारदर्शी क्षेत्र म्हणून समाज त्याच्याकडे पाहत आहे, पण आज शिक्षण क्षेत्राचा अनागोंदी व अस्वच्छ कारभार पहील्या वर मन सुन्न होते, ज्यांच्या हाती ऑनलाईनची सुत्रे असतील पण ते जर अस्वच्छ असतील तर काय उपयोग उद्याच्या भारताचे नागरिक घडविणारे शिक्षकच जर नाराज होणार असतील तर काय उपयोग. बदल्यांची कोणतीही पद्धत वापरा ती चालविणारे हात स्वच्छ असले पाहिजे नाहीतर तर काही हितसंबंधियांचेच कामे होतील त्यात पारदर्शी पणा रहाणार नाही, या कामी स्वच्छ मानसिकताच असणे गरजेचे आहे व त्या मुळे प्रामाणिक शिक्षकांवर अन्याय होणार नाही व तो निश्चित पणे उद्याच्या भारताचे स्वच्छ नागरिक घडवेल. भास्कर जाधव
पारदर्शकता आणाच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jun 2019, 5:40 am