उपनगर येथिल शांतिपार्क मध्ये मनपा च्या उद्यानाला जंगल चे स्वरुप आले आहे. उद्यान सर्वदूर गाजर गवत व इतर अनावश्यक झाडांनी व्यापलेला आहे. पूर्वी व्यवस्थित उभे असलेले वीजेचे खांब काढून मोजके वीजेचे खांब लावण्यात आले आहे त्यातलेही काही दिवे बंद अवस्थेत आहे. सध्या नाशकात बिबट्याची दहशत आहेच या जंगलात सहज लपून बसला तर कळणार नाही. अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती व डेंग्यू ची धास्ती आहेच. उद्यानात ज्येष्ठ नागरिकांना बसायला सोय नाही. तरी क्रुपया मनपाने उद्यानातील अस्वच्छता, अपुरा प्रकाश खेळाचे साहित्य व ग्रीन जिम ची योग्य दखल घेऊन उपाययोजना करावी.
मनपा शांति पार्क ची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Nov 2019, 5:43 am