विजेच्या खांबाला वेलींचा विळखा
Maharashtra Times 30 Sep 2016, 11:58 am
नाशिकमधील प्राचीन श्री नवश्या गणपती मंदिराच्या परिसरात विजेच्या खांबाला वृक्षवेलींनी असे वेढले आहे, की येथे विजेचा खांब आहे की नाही, असा प्रश्न पडतो. असे दृश्य शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसून येते. वीज कंपनीच्या नाशिक विभागाने जर नियमित स्वच्छता केली, तर अशा वृक्षवेली वाढणार नाहीत. अनुचित घटना घडण्याअगोदर लवकरात लवकर अशा वृक्षवेलींपासून खांब मुक्त करावेत.
-जगदीश बोडके, पंचवटी
-जगदीश बोडके, पंचवटी