गोदावरीच्या विविध पवित्र कुंडा जवळपास निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत पण संख्येने कमीच आहेत.निर्माल्य कलशांची संख्या वाढवावी तसेच निर्माल्य कलश ज्या ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत तिथे कायमस्वरूपी स्वच्छता कर्मचारी उपस्थित राहून निर्माल्य व्यवस्थितपणे टाकले जावे याकडे त्यांचे लक्ष असणे गरजेचे आहे.आरोग्य विभागाने नियोजन करावे.गोदावरीच्या तीरावर स्वच्छता मोहीम सुरूच असावी. कडक धोरण अवलंबने काळाची गरज आहे.पवित्र तीर्थक्षेत्र आहे,सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
निर्माल्य कलश संख्या वाढवावी व कर्मचारी नियोजन करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Mar 2020, 5:46 am