शहरातील पावसाळ्या पुर्वीची व आत्ताची रस्त्यांची परिस्थिती पाहीली तर तुम्ही केलेल्या कामाचा दर्जा हा कसा आहे हे सांगायला ज्योतिषाची गरजच नाही पाऊसच हा फार मोठा क्वालीटी कंन्ट्रोलर 'आहे,शहरातील खड्यांवर मुरुम टाकुन मलमपट्टी करणे म्हणजे शहरवासियांचा विश्वास घात करण्या सारखे आहेत कारण ते कराच्या रुपाने पैसे देतात त्याप्रमाणेच त्यांना सेवाही मिळायला हवीच येथुन पुढे असे खड्डेयुक्त रस्ते दिसले तर महापालीकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई करून कायम स्वरूपी सिमेटचे रस्ते बनवावेत व प्रत्येक काम हे नियोजनबद्ध पद्धतीचे असावे ही विनंती.भास्कर जाधव. सातपुर काॅलनी (नाशिक).
'ही तर जनतेच्या डोळ्यात केलेली धुळफेकच म्हणावी ''
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Oct 2020, 5:32 am