करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांनी घेतलेले निर्णय खुपच स्तुत्य आहेत. मूर्तीपूजा करुन गणपती उत्सव साधेपणाने साजरा करायचा आहे. उत्सव काळात विविध गणपती मंडळांनी हाती घेतलेल्या कार्यक्रम रक्तदान शिबिर, प्लाजमा थेरपी, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत व इतर सामाजिक कार्यक्रम योजिले आहेत. महाराष्ट्रातील सर्व गणपती मंडळांनी वर्गणी गोळा न करता साधेपणे अथवा 'एक गाव एक गणपती' ही संकल्पना अंमलात आणावी, ह्या साठी राज्य शासनानेही पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविण्यात मंडळांना उद्युक्त करावे.
'लालबागचा राजा' - सार्वजनिक गणेशोत्सव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jul 2020, 5:30 am