शहरात सध्या मोबाईल चोरीचे गुन्हे दिवसेंदिवस सुरूच आहे. मोबाईल हा अत्यंत महत्त्वाची व कामाची वस्तू असल्याने सगळेच महत्वाचे नंवर व बरेच कोड त्यात सेव्ह असते. त्यामुळे मोबाईल चोरीला गेला तर खूपच त्रासदायक होते. विशेषत गर्दी च्या ठिकाणी मोबाईल मारला जातो. जसे - भाजी बाजारात , बस स्थानक व पान स्टाॅल याठिकाणी मोबाईल चोरला जातो. तसेच मोबाईल वरून बोलत असताना आपण बेसावध असतो त्याच क्षणी मोबाईल चोरला जातो. बहुतांश मोबाईल चोरटयांना पकडून जप्त करण्यात पोलीस यंत्रणा यश मिळविते पण काही तक्रारींची व गुन्ह्यांची नोंद न झाल्याने नागरिक संतप्त झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे सावध , दक्ष व सतर्क राहणेच योग्य आहे. सौ. स्नेहा मुकुंद शिंपी नाशिक
मोबाईल चोरीचे सत्र सुरूच.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Mar 2017, 5:30 am