तीन टप्प्याची दिलेली मुभा ही कितपत यशस्वी होते या बद्दल अजूनही शंका आहे. वीज बिल कमी करण्याची आशा ग्राहकांनी ठेवली होती परंतु एक वेगळीच योजना महावितरणने आणली. या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर, आता महावीतरण ने सर्वांना मान्य असेल असा सुवर्णमध्य काढावा जेणे करून ग्राहकांना त्रास होणार आहे व महावितरणचे नुकसान सुद्धा होणार नाही.दरम्यान, विधनसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विनंती केली आहे कि लॉकडाउन मधील विजबील पन्नास टक्के कमी करावेत.आता ह्या बाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे लवकरच कळेल व अधिक स्पष्टता येईल.
महावितरणने 'सुवर्णमध्य' काढावा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jul 2020, 5:30 am