गंगापूर धरणात आज दोन जणं पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजता घडली. याआधी पण अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत तरीही काहीच बोध न घेता जीवाशी खेळ खेळणे घातकच ठरते. कोणी पोहण्यासाठी तर कोणी पाण्यात सेल्फी काढण्यासाठी गेले असता जीव गमावल्याची अनेक उदाहरणे आहेत. अति खोल पाण्यात अंदाज घेऊनच उतरणे योग्य आहे हे कळायला हवे. पाणी हे जीवनदान जरी असले तरी ते जीव पण घेऊ शकते , हे विसरू नये. सौ. स्नेहा मुकुंद शिंपी नाशिक
जीवाशी खेळ नको.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Apr 2017, 5:30 am