मंत्री व त्यांचे दौरे म्हणजे सर्व सामान्य जनतेला असुन अडचण नसुन खोळंबा असाच प्रकार आहे कधी तरी उगवणारे मंत्री व त्यांच्या साठी उठबस करणारे प्रशासन यांचा सामान्य माणसाला नेहमीच त्रास होतो या सर्व गोष्टी वरीष्ठ माणसांना माहीतच असते तरीही त्यांना काहीही घेणं देणं नसते त्या निमित्ताने द्वारका पुणे महामार्गाचेही काही अंतरा पर्यंत भाग्य उजळले ते वाहन धारकांना त्रास देवुन तेव्हा सामान्य माणूस काय करणार, ज्याच्या हाती ससा तोच पारधी म्हणून गप्प बसावे.भास्कर जाधव.सातपूर कॉलनी (नाशिक).
'' असुन अडचण नसुन खोळंबा ''
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Oct 2019, 5:42 am