शहरात स्मार्ट सिटीच्या कामाचा धडाका सुरु असतांनाच नागरिकांना पर्यायी मार्ग किंवा पार्किंग पुरवण्याचा स्मार्टपणा पालिकेने दाखवला नाहीय. भरीसभर म्हणून वाहतुक पोलिसांच्या कार्यतत्परतेने(?) नागरिक जेरीस आलेले आहेत. आधीच पार्किंगच्या नावने बोंब त्यात पोलिसांनी उचलून नेलेल्या वाहनाचा दंड नागरिकांना खिशाला दंड देतोय. दंडाची उचलून नेणार्या वाहनावरील छापील रक्कम आणी प्रत्यक्षात वसुल केली जाणारी रक्कम यात तफावत आहे. तीनशे रुपये दंड भरताना मात्र नव्ह्यान्नव रुपयाचे पावतीवर नागरिकांची बोळवण केली जाते, जोडिला बाकिच्या दोनशे रुपयाचा दंडाची पोच एसएमएस वर देण्यात येईल अस सांगितले जातेय जो एसएमएस कधी येतच नाही. विचारणा करायला गेल्यास पोलिस अन् कंत्राटदाराच्या माणसांकडुन उडउडवीची उत्तरे अन दमदाटी सहन करावी लागतेय. अशी ही स्मार्ट कर्तबगारी लोकांना नकोशी झालीय .राम उगले, सीबीएस
ही तर लूटच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2019, 5:42 am