आज समाजा मध्ये झपाट्याने पसरत चाललेली बाल वयातील गुन्हेगारी ही उद्याच्या समाज व्यवस्थेला निश्चितच काळजीचा विषय होवु पहात आहे ,आजचा बाल वयातील गुन्हेगार जर तुम्ही वेळीच लक्ष दिले नाही तर तो उद्याच्या समाजा तील एक मोठा गुन्हेगार होवु शकतो ,यास अनेक कारणे आहेत पण यास पालक या नात्याने आपणही तेवढेच जबाबदार आहोत का याचा प्राधान्याने विचार आपण केला पाहीजे पुत्र प्रेमा पोटी आपण मुलांना मागितल्यावर लगेच ती गोष्ट देतो याची गरज आहे का? हे बघत नाही मुलं बाहेरील जगात कुठे जातात काय करतात हेही बघत नाही ,वडिलांनी विरोधकेला तर आई प्रेमापोटी त्याचे समर्थन करते एकाधी गोष्ट मिळाली नाही तर मुलं अन्य मार्ग अवलंबतात ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात हे प्रमाण अधिक आहे तेव्हा शालेय शिक्षणा बरोबरच त्यांना सुसंस्कृत कसे करता येईल एवढं तरी पालकांनी केले तरी पुरेसे होईल. भास्कर जाधव
पालकच कारणीभूत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 May 2019, 5:40 am