शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षेबाबत पालकांनी अधिक जागरूक होणे गरजेचे आहे. आपला पाल्य ज्या रिक्षेतून प्रवास करतो, त्यातील विद्यार्थी संख्या लक्षात घ्यावी. तसेच नियमभंग करणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी. जास्त विद्यार्थी बसविले जात असतील, तर रिक्षा बदलविण्यात यावी. पालकांनी पुढाकार घेतला, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी होणारा खेळ थांबेल. - किरण गुडघे
पालकांनी जागृत रहावे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2020, 5:45 am