महानगरपालिका नाशिक यांनी अनेक हेतू डोळ्यासमोर ठेवून प्रतिवर्षी करोडो रुपये खर्चून उद्यानांची निर्मिती केली आहे.भूमिपूजन व लोकार्पण यांच्यासाठी लाखो रुपये खर्च केले,बातम्या आल्या,फोटो झळकले पण फोटोत झलकणारी मंडळी त्यांनतर उद्यानांकडे झळकली नाही,पूर्णपणे पाठ फिरवली म्हणून पाण्यासारखा पैसा खर्च करून देखील उपयोग झाला नाही.जेष्ठ नागरिक,बालगोपाल महिलांना व सर्वानाच विरंगुळा व व्यायामाची गाईसोय झाली आहे.महापालिकेने कायमस्वरूपी माळी नेमावा,प्रत्येक विभागासाठी निरीक्षक नेमावेत,परिसरातील स्थानिक होतकरू व्यक्तींची नेमणूक करावी,दरमहा अहवाल मागवावे,दुरावस्था असलेल्या उद्यानांची अधिकारी वर्गाने वेळीच दखल घ्यावी,कारवाई करावी
उद्यानांची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Feb 2020, 5:45 am