शहरात सध्या पाचव्या लॉकडाऊनचे पर्व पुर्ण होवुनही शहरातील नागरीकांचे रस्त्यावरील फिरणे थांबलेले नाही, आता जनता कर्फ्यू सायंकाळी सात ते पहाटे पाच वाजेपर्यंत लावुन काय साध्य होणार आहे, सायंकाळी सात पासुन पुढे नागरिक कितीसे फिरतील, त्यापेक्षा हीच कर्फ्युची वेळ दिवसभर ठेवून त्यातुन अत्यावश्यक सेवांना ठराविक वेळ देवुन जनता कर्फ्यूचे पालन अधिकाधिक कडक करावे व जो कुणी याचे उल्लंघन करेल त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला तरच नागरिकांचे रस्त्यावरील फिरणे कमी होईल व कदाचित कोरोना रुग्ण संख्याही कमी होण्यास मदत होईल. भास्कर जाधव.
'' जनता कर्फ्यू ची वेळच बदलण्याची गरज ''
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jul 2020, 5:30 am