मुबंई आग्रा महामार्गावरील अमृतधाम येथील मुख्य चौफुलीच्या मध्यभागातील ड्रेनेजवरील ढापा तुटलेल्या अवस्थेत आहे.अपघात होऊ नये म्हणून तुटकी व जीर्ण अवस्थेत असलेली जाळी अर्धवटच टाकली आहे.दिवसभरात लाखो लहान मोठी वाहने सारखी ये जा करीत असतात.यापूर्वी याच ढापा मुळे एकाचा बळी गेला आहे पुन्हा अपघात होऊ नये व कोणाचा बळी जाऊ नये याकरिता खबरदारी घ्यावी व ढापा बसवावा अशी मागणी परिसरातून नागरिक करीत आहे.
अमृतधाम चौफुली वरील ढापा बसवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 3:54 pm