सध्या शहरात स्मार्ट रोड चे का चालू आहे ,तेथेच कलेक्टर कचेरी पण आहे ,विविध संघटना मोर्चे काढून निवेदन सरकार ला देण्यासाठी कलेक्टर कचेरी येथे येतात,त्यामध्ये सामान्य नागरिक वेठीला धरले जातात, कालच्या मोर्च्याच्या वेळी जागोजागी वाहतूक कोंडी झाली होती असे नेहमीच होते. अजून काही महिन्यानी निवडणूक साठी अर्ज भरण्या पासून ते देण्यासाठी सर्वच जण मोर्चांनी येतात किंवा अन्य कोठेही काही घटना घडली तर मोर्चा काढण्यात येतो तर अशावेळी सर्व संबंधितांना एक विनंती आहे की त्यांनी सामान्य जनतेची अडवणूक का करतात? तसेच सरकारने ही म्हणजे कलेक्टर नी किंवा संबंधित अधिकारी ह्यांनी मोकळ्या मॆदाना वर मोर्चा ला सामोरे जावे व निवेदन स्वीकारावे.किशोर शेंदूर्णीकर
आंदोलनांची कोंडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jul 2019, 5:42 am