नवीन २०२१ हे नुतन वर्ष हे दाराजवळ येवुन पोचले तरी कोरोना आपला गाशा गुंडाळण्याचे नाव घेत नाही, त्याच्या वाढलेल्या मुक्कामास आपण न पाळलेले सुरक्षा नियमच कारणीभूत असुन आता तर नव वर्षात सरकारचे शाळा सुरु करण्याचे प्रयोजन असुन त्यासाठी शाळा व्यवस्थापनानेच आता सुरक्षा अंमलबजावणी साठी कंबर कसली पाहीजे, त्यासाठी पालकवर्ग सर्वतोपरी आपल्या पाल्यांना सुरक्षेचे किट घालुनच पाठवतील पण खरी सर्वस्वी जबाबदारी ही शालेय व्यवस्थापनाचीच असुन त्यांनी शाळा परिसर व प्रत्येक वर्ग हा सॅनिटाईज करुन घ्यावा, व प्रथम प्राधान्य सुरक्षित वावरास द्यावे.भास्कर जाधव.सातपुर कॉलनी (नाशिक).
'' शाळांनी कोरोना सुरक्षा त्रिसूत्रींचे पालन करावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jan 2021, 5:32 am