लॉक डाऊनचे नियम शिथिल होऊन शहरांतर्गत वाहतूक सुरू झाली आहे. तरी देखील चौका चौकातील सिग्नल यंत्रणा मात्र अजूनही कार्यान्वित करण्यात आलेली नाही. सदरची बाब गंभीर असून त्यामुळे अपघात होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. तसेच लवकरात लवकर सिग्नल सुरू करण्यात यावे, जेणेकरून एखादा विचित्र अपघात होणार नाही व वाहनचालकही वाहतुकीच्या नियमांचे शिस्तीने पालन करतील. त्याच बरोबर सिग्नलच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे मला वाटते.
सिग्नल बंद गंभीर बाब
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 May 2020, 5:30 am