घरातील कचरा घेण्यासाठी दाराशी घंटागाडी दररोज येत असतांनाही काही शहरवासीय कचरा जवळच कुठे तरी फेकुन देतात, कचरा घंटागाडीतच टाकावा यासाठी यासाठी अनेक वेळेला प्रबोधन करुनही झाले आहे, घंटागाडीतील या विषयीची कॅसेट दररोजच ऐकवली जाते, तरीही 'हम नही सुधरेंगे' असेच वर्तन काही नागरिकां कडुन होत आहे, सर्वच शहरभर कचरा पसरल्याचे, रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा गंज ही तर न संपणारी गोष्टच झाली आहे आता महापालीका प्रशासनाने अशा घंटागाडीत कचरा न टाकणारे नागरिकांवर कठोर कारवाई करुन 'रोग प्रतिबंधक कायद्यांन्वये 'गुन्हा दाखल करुन आर्थिक दंडही वसुल करावा, तरच या गोष्टींना आळा बसु शकेल.भास्कर जाधव.सातपुर कॉलनी (नाशिक).
'' आता कठोरपणे कारवाई करण्याची गरज ''
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jan 2021, 5:31 am