अश्या प्रकारचे दृश्य आपण नेहमी पहातो. हे दृश्य पदपथ दिव्यांचे आहे जे दिवसा चालू आहे. बहुतेकजण अनेकदा तक्रार करतात की, नगरपालिका दिवसा दिवे चालू ठेवतात, नगर पालिकेचे लक्ष्य कुठे आहे. परंतु नगरपालिका दिवे विनाकारण दिवसा चालू ठेवत नाही त्यामागे काही तरी कारण असते , नगरपालिका कर्मचारी पदपथ दिव्यांची तपासणी करत असतात किंवा ते दुरुस्त करत असतात त्या कारणामुळे ते दिवसा दिवे चालू करतात. परंतु काही लोक अश्या प्रकारे दिवे चालू दिसले की नगरपालिकेला दोष देतात, परंतु त्या मागे काहीतरी करण असते हे आपण जाणून घेतले पाहिजेत व विनाकारण नगरपालिकेला दोष न देता नगरपालिकेला सहकार्य केले पाहिजे.
नगरपालिकेला विनाकारण दोष देऊ नये.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Aug 2018, 5:38 am