साईनाथ नगर येथे भुयारी गटारी चे कामे काही महिन्यापूर्वी करण्यात आले आहे त्यादरम्यान डांबरीकरण रोड फोडण्यात आले होते दुरुस्ती म्हणून मागील महिन्यामध्ये खडी टाकून सोडून दिले आहे अशातच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच याठिकाणी पाण्याचे डबके साचले असून मोठ्या प्रमाणात चिखल पसरलेला आहे नागरिकांना येणे जाणे करिता तारेवरची कसरत करावी लागत आहे सध्या करोना चा पादुर्भाव सुरू आहे अशातच या पाण्याच्या डबक्यात मुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही यामुळे या रोडचे डांबरीकरण त्वरित होणे आवश्यक आहे
रस्ता दुरुस्त करणे आवश्यक आहे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2020, 5:30 am