नगरपालिकेने पाणी कपात केली आहे, ती योग्यच आहे. एकीकडे नाशिक च्या सिडको सातपूर भागात पाण्याचा सर्रास अपव्यय करतांना नागरिक दिसतात दुसरीकडे दुष्काळी भागात लोक पाण्यासाठी वणवण उन्हात फिरत आहे. शहरातील नागरिकांना जो पर्यंत पाण्याचं महत्त्व कळत नाही, तो पर्यंत पाणी कपात करणे योग्य आहे. व मान्सून लांबल्याने गंगापूर धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. जुलै पर्यंत धरणातील पाणी पुरल पाहिजे, या हेतूने पाणी कपात केली असावी. त्यामुळे नाशिकरांनी पाणी जपून वापरले पाहिजे.चंद्रकांत महाले
पाणी कपात योग्यच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jun 2019, 5:42 am