अनेक ठिकाणी रस्त्याचे काम चालू आहे जेव्हा काम चालू झाले तेव्हा कामाला वेग होता परंतु आता कामाला संथ गती झाली आहे . कामाचा वेग वाढवणे गरजचे आहे . संबधित विभागाने लवकरात लवकर काम वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. रस्त्यावर खूप ठिकाणी रस्त्याचा कच्चा माल अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेला आहे. कच, खडी फुटपाथ चे ठोकळे , अजून काही लागणारे यंत्र सामग्री पण आहे रस्त्यावर साचलेल्या कच मुळे काही वाहने घसरून पडून अपघात होत आहे .सर्वात महत्वाचे काम झाल्यावर ते कच वाळू काम करणाऱ्या मजुरांकडून फावड्यानी ओढून एका ठिकाणी जमा केला पाहिजे वाहतूक होत असलेल्या ठिकाणी कच आणि वाळू गेली असेल तर तिची रोजच्या रोज साफसफाई झाली पाहिजे ... यांनी अपघात पण कमी होतील आणि वाहतूक करणाऱ्या दुचाकी धारक नागरिकांना त्रास होणार नाही
कामाला गती येणे गरजेचे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2020, 5:46 am