बालिकाश्रम रोडनगर शहरातील बालिकाश्रम रोड भागात भुयारी गटारीचे काम करण्यासाठी मोठे पाईप आणण्यात आले होते. काम झाल्यानंतर शिल्लक राहिलेले पाइप नवीन कामाच्या ठिकाणी न नेता तेथेच टाकण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे पाईप तेथे पडून असून त्यांच्या आजूबाजूला घाण साठली आहे. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित कंत्राटदार किंवा महापालिकेने याची दखल घेऊन पाईपची योग्य ती विल्हेवाट लावण्याची गरज आहे.- सोमनाथ सूर्यवंशी
शिल्लक पाईपचा अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Aug 2017, 5:33 am