सिध्दार्थनगरशहरातील सिध्दार्थनगर भागात उघड्या नालीतून पाणी रस्त्यावर वाहत आहे. नालीत कचरा आणि गाळ साठतो. त्यामुळे पाणी तुंबते. ते रस्त्यावरून वाहने. जेथे खड्डे आहेत, तेथे हे पाणी दीर्घकाळ साठून राहते. त्यामुळे पाऊस असो अगर नसो, येथील रस्त्यावर कायम पाणी असते. त्याची परिसरात दुर्गंधी पसरते. वाहनचालक आणि नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. महापालिकेच्या आरोग्य विभागाने यामध्ये लक्ष घालून दुरूस्ती करण्याच आवश्यकता आहे.-सोमनाथ सूर्यवंशी
नालीचे पाणी रस्त्यावर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2017, 5:31 am