नालासोपारा पूर्वेकडील रेल्वेस्टेशननजीक असलेल्या उड्डाणपुलाखाली दररोज अशाप्रकारे भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण दिसून येते. शिवाय त्याच ठिकाणी रिक्षास्थानक असून तेथूनच वसई विरार मनपा परिवहन सेवेच्या बसेस सुटत असतात. परिणामी संध्याकाळच्या सुमारास येजा करताना प्रवासी तसेच नागरिकांची मोठी गैरसोय होते. तेथील अतिक्रमण हटवून तो परिसर रहदारीसाठी मोकळा करावा, अशी मागणी सिटिझन रिपोर्टर सुनील काजारे यांनी केली आहे.
भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2017, 5:39 am